Tuesday, 13 September 2011

इंटरनेट प्रायव्हसी विषयीचे अज्ञान

प्रश्न जर अज्ञानाचा असेल तर ते ज्ञानी माणसांकडून घ्यावे. पण ज्ञानी माणूस भारोस्याला पात्र नसेल तर.
अणु उर्जेचा वापर योग्य व अयोग्य दोन्ही कामांसाठी होतो. पण हे लोकांवर तेवढेच अवलंबून असते कि तो वापर लोकांनी कसा करावा.
जपानचे उदाहरण घेतल्यावर अणु उर्जेने किती फायदा व नुकसान होते हे कळते.
पण अशा वेळी असे प्रश्न घेऊन बसने तेवढेसे योग्य नाही कि घराघरातील वापाराने किती घातक असू शकते ते.

 ज्यावेळी देशाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असते त्यावेळी काही नादुरुस्त जणांचा  विचार करणे तितकेसे योग्य नाही.
कॉम्पुटर इन्जिनिअर'स ना मोठ्याप्रमानावर रोजगार उपलब्ध करणाऱ्या सर्व कंपन्या या जेव्हा सर्व माहिती एकाच ठिकाणी दुसर्याच्या हाती देऊन बेफिकारीने फिरत असतात एवढ्यावर सर्व संपत नसून देशातील सरकार हे अशा कंपन्यांच्या मागोमाग चालून आधार (UID) सारख्या प्रोजेक्टमधून आपल्या देशातील सर्व माहिती काही कंपन्यांच्या कॉम्पुतेरवर एकत्रित केली जाणार आहे. देशाती बर्याच संस्था मदत करण्याच्या नावाखाली एका धंद्याची माहिती दुसऱ्याला विकत असतात. अशा वेळी आधार (UID) मधून काय अपेक्षा ठेवावी.

सांगायचे तात्पर्य एवढेच कि इमारतीचा पाया हा कमकुवत असेल तर त्यातील सजावटीवर कितीही खर्च केला असता त्याच्या किमतीत जराही फायदा होणार नाही.
राष्ट्रीय सुरक्षिततेचा व राष्ट्राला चालवणाऱ्या महत्वाच्या कंपन्यांची धोरण जर चुकीची असतील तर राष्ट्रातील सामान्य माणसांपासून आपण काय अपेक्षा ठेवाव्यात हे आपण आपले ठरवावे.

No comments:

Post a Comment